Parbhani Farmer Suicide;राणी सावरगांवात शेतकऱ्याने मृत्यूला कवटाळले
सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या;पिंपळदरी पोलीसांत गुन्हा दाखल
Farmer Suicide :परभणी(राणी सावरगांव)
परभणी जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून नववर्षाची पहाट उजाडताच रात्री जिल्ह्यांतील राणी सावरगाव येथे शेतकरी आत्महत्येची घटना घडल्याचे उघडकीस आले असून,एका ४० वर्षीय तरुण शेतकऱ्यांने सततच्या नापीकीने अर्थिक विवंचनेत सापडल्याने चिंतातुर होऊन गावातील सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन मृत्युला कवटाळल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.याप्रकरणी पिंपळदरी पोलीसांत नोंद करण्यात आली आहे.
भगवान मोतीराम राठोड वय ४० वर्ष, असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे आहे. याबाबत सुर्यकांत चव्हाण यांनी खबर दिली आहे की, शेतातील सततच्या नापिकीमुळे डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत चालला आहे.अर्थिक अडचण दिवसेंदिवस वाढतच चालली आहे.मुलाबाळांचे पालन पोषण कसे करु या
चिंतेत वैफल्यग्रस्त होऊन भगवान राठोड यांनी १ जानेवारी रोजी रात्री १०:३० वाजेच्या सुमारास बसस्टँड जवळील सार्वजनिक विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. सदर प्रकरणी पिंपळदरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे.