बाबासाहेबांनी लिहिलेल्या परिवर्तनशील संविधानाला जगात तोड नाही-डॉ.अजित अभयंकर
पूर्णेत भारतीय संविधान गौरव सोहळा- संयोजक रिपाईचे नेते आंबेडकरीनेते प्रकाशदादा कांबळे
भारतीय संविधान हे एक खुले पुस्तक आहे.जगामध्ये लोकशाही राष्ट्रांमध्ये जे संविधान आहे त्या सर्व संविधानापेक्षा डॉ .बाबासाहेबांनी लिहिलेले संविधानच सर्वश्रेष्ठ आहे.जगाच्या पाठीवर धर्माच्या नावाने जे राष्ट्र उभी राहिली त्या राष्ट्रांमध्ये अराजक निर्माण झाली. पाकिस्तानसारखी राष्ट्र धर्माच्या नावाने निर्माण झाले.त्या राष्ट्रांमध्ये खरी लोकशाही निर्माण होऊ शकली नाही. भारतीय संविधानाने भारताला एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र बनवले त्यामुळेच बाबासाहेबांनी लिहिलेल्या परिवर्तनशील संविधानाला जगात तोड नाही असे प्रतिपादन संविधानाचे गाढे अभ्यासक विचारवंत डॉ.अजित अभ्यंकर यांनी केले.
पूर्णा येथे ता.२६रोजी अ.भा.भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो मार्गदर्शनाखाली संविधान गौरव समितीच्या वतीने संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन केले होते.यावेळी ते बोलत होते.या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून खा.संजय जाधव,अध्यक्ष म्हणून स्वा.रा.तीर्थ विद्यापीठ प्रो.डॉ.राजेंद्र गोणारकर, संविधानाचे गाढे अभ्यासक मंचावर प्राचार्य मोहनराव मोरे,अँड रवी गायकवाड, जाकीर कुरेशी,उत्तमभैया खंदारे,दयानंद सोनकांबळे, पो.नि विलास घोबाडे,दादाराव पंडित,जलील पटेल, अनिल खर्गखराटे, अब्दुल मुजीब अँड.हर्षवर्धन गायकवाड,पत्रकार संजय बगाटे आदींची उपस्थिती होती.यावेळी खा.संजय जाधव यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी संविधान पत्रीकेचे वाचन अशोक कांबळे यांनी केले.तर सन्मानार्थ शहीद झालेले विजय वाकोडे यांच्या सुविद्य पत्नी ५० हजार रुपयांची मदत देण्यात आली. प्रोफेसर डॉक्टर आदिनाथ इंगोले यांनी संविधाना गौरव समितीने पारित केलेल्या ठरावाचे वाचन केले.
_________________________________
प्राचीन बौद्धकालीन गणराज्यांची जे लोकशाही वर आधारित होते. तथागत भगवान बुद्ध हे लोकशाहीचे प्रथम उदगाते होते. भारतीय संविधानामध्ये बुद्ध विचाराचे प्रतिबिंब पहावयास मिळते असे भदंत डॉ. उपगुप्त महाथेरो यांनी केले.
_______________________________
बाबासाहेब आंबेडकरांच्या मानवतावादी समता मुलक समाज निर्मितीच्या प्रक्रिये मध्ये त्यांचे योगदान मोठं होतं. पूर्णा शहरांमध्ये भारतीय संविधानाचा गेल्या ते वीस वर्षापासून सातत्यपूर्ण जागर होतो ही अभिमानास्पद बाब आहे.असं खा.बंडू जाधव म्हणाले.
____________________________________________पूर्णा शहरामध्ये संविधान जाणीव जागृतीचा कार्यक्रम अतिशय मोलाचा आणि महत्त्वपूर्ण आहे. त्याचे अनुकरण संपूर्ण देशामध्ये झाले पाहिजे. आपल्या अध्यक्षीय समारोपामध्ये सुप्रसिद्ध विचारवंत डॉक्टर राजेंद्र गोणारकर म्हणाले.
प्रास्ताविक संविधान गौरव सोहळ्याचे मुख्य संयोजक प्रकाश कांबळे यांनी कार्यक्रमाची भुमिका विशद केली.सूत्रसंचालन जगदीश जोगदंड,आभार श्रीकांत हिवाळे यांनी केले.