डॉ.दत्तात्रय वाघमारें सारखे निष्काम कर्मयोगी निर्माण झाले पाहिजेत-मा.शिक्षण संचालक डॉ.नांदेडे

Spread the love

पूर्णेत डॉ.वाघमारे यांचा सेवा समर्पण सन्मान समारंभ संपन्न


पूर्णा(प्रतिनिधी)
“राष्ट्र हे शाळेत घडत असतं”.विद्यार्थी हे देशाचे भावी आधारस्तंभ आहेत. त्यांच्यावर चांगले संस्कार करणे काळाची गरज आहे. विद्या प्रसारिणी शाळे सारख्या आदर्श शाळा घडवणारे निष्काम कर्मयोगी “निर्माण झाले पाहिजेत.” ही काळाची गरज आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे पूर्व शिक्षण संचालक डॉ. गोविंद नांदेडे यांनी मांडले.
             पूर्णा येथील विद्या प्रसारक मंडळाच्या वतीने नुकतेच येथील विद्या प्रसारणी शाळेत शाळेचे अध्यक्ष म्हणून निस्वार्थ भावनेने सलग ५५ वर्ष काम पहाणा-या जेष्ठ समाजसेवक डॉ.दत्तात्रेय वाघमारे यांच्या सेवा समर्पण सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम ता.१२ बुधवार रोजी शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला, यावेळी डॉ.नांदेडे बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या प्रसारिणी सभा संस्थेचे नवनिर्वाचीत अध्यक्ष डॉ.विनय वाघमारे हे होते.प्रमुख अतिथी म्हणून डॉ. गोविंद नांदेडे हे होते. पुढे बोलताना ते म्हणाले की डॉ. वाघमारे साहेबांचे कार्य सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य कृषी, पर्यावरण अशा सर्वच क्षेत्रात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान लाभले म्हणून ते पूर्णेचे खरे कर्मयोगी आहेत.असंही डॉ.नांदेड म्हणाले. प्रसंगी कार्यक्रमाला डॉ. नंदिकेश्वर शिवाचार्य महाराज, वेदसंपन्न उमेश महाराज टाकळीकर, डॉ.वाघमारे यांच्या पत्नी डॉ.सौ.शांताबाई वाघमारे, संस्थेचे  भिमरावजी कदम, श्रीनिवासजी काबरा,विजयकुमार रुद्रवार, उत्तमरावजी कदम, साहेबरावजी कदम,बाबुराव मोरे, सौ.विद्याताई पवार, ज्ञानदेव रणमाळ, डॉ.प्रेमचंद सोनी,हरिभाऊ पाटील, श्रीमती सुमन हयातनगरकर,श्री शिरपूरकर,श्री गायकवाड,मुख्याध्यापक देविदास उमाटे,शिवदर्शन हिंगणे,श्रीमती अतिया मॅडम, सुनील क्षिरसागर हे व्यासपीठावर उपस्थित होते.
   मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ.दत्तात्रेय वाघमारे यांची ग्रंथतुला करण्यात आली.ती सर्व पुस्तके शाळेच्या ग्रंथालयाला भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक -डॉ. हरिभाऊ पाटील यांनी केले. शिक्षणाधिकारी श्री विठठल भुसारे साहेबांनी तुफानातील दिवे’ ही कविता गाऊन श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.आभार मुंजाजी मोरे यांनी केले व बहारदार सूत्रसंचालन पाराशर स्वामी यांनी केले.
  डॉ. वाघमारे यांनी सत्कारानंतर भावप्रकटीकरण करतांना मी कार्य करीत गेलो. सर्व सहकार्याची साथ मिळाली. म्हणून मी एवढे वैभवशाली शाळा उभी करू शकलो मी निमित्तमात्र होतो असे म्हटले.

You cannot copy content of this page