महाबोधी महाविहारमुक्ती आंदोलन;पूर्णेत स्वाक्षरी मोहीमेला उदंड प्रतिसाद
पूर्णा(प्रतिनिधी):
शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात ता.७ एप्रिल सोमवार रोजी सकाळी पासून वंचित बहुजन आघाडी कार्यकर्त्यांच्या वतीने बिहार येथील महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलना अंतर्गत महाबोधी महाविहार आखील भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी महा स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली.
यावेळी वंचितचे युवक जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड, संदीप सावळे,सुनील मगरे,राजू नारायणकर, सिताराम रेणगडे, सुनील गवळी,अजय काळे,राधिका गोधणे, मिलिंद सोनकांबळे, शाहीर प्रकाश जोंधळे, नितीन बोधक,शबीर पठाण,शेख तौफिक यासह सर्व आंबेडकरवादी, संविधानवादी, समतावादी सह आम जनतेने सहभाग नोंदवून असंख्य स्वाक्षऱ्या केल्या. दरम्यान, बिहार राज्यातील बुध्दगया येथील महाबोधी महाविहार हे तेथील शासनाच्या ताब्यात असून त्या ठिकाणी भिख्खू संघास व भगवान गौतम बुध्दांचे आनुयायांना हिन वागणूक दिली जाते.अनेक दिवसांपासून सदर महाबोधी महाविहार आखील भारतीय भिक्खू संघाच्या ताब्यात देण्याच्या मागणीसाठी मोठे आंदोलन चालू असूनही ते मुक्त केले जात नाही.सन १९४९ च्या जाचक कायदा रद्द करुन महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्यावे, बौद्ध गया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण आंतरराष्ट्रीय बौध्दांना सोबत घेऊन बौद्धांच्या ताब्यात द्यावे,या मागणीसाठी ठिकठिकाणी मोठे आंदोलन चालू आहे.तरीही बिहार राज्य व केंद्र सरकारला जाग येत नाही.त्यामुळे सरकार विरूद्ध भगवान गौतम बुद्ध यांच्या आनूयायातून असंतोष खदखदत आहे.