सामाजिक सलोखा राखणे सर्वांचीच जबाबदारी-उप्पर पो.अधिक्षक काळे

Spread the love

पूर्णेत शांतता समितीची बैठक संपन्न

पूर्णा(प्रतिनिधी)

सामाजिक सण,उस्तव साजरे करताना जातीय तेढ निर्माण होऊ न देता सामाजिक सलोखा कायम राखणे ही सर्व सामान्य नागरिकांची जबाबदारी आहे.ती जबाबदारी सर्वांनी पार पाडल्यास सण उस्तव शांततेत उत्साहात साजरे होतील असे प्रतिपादन परभणी जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांनी केले.      

पूर्णा पोलीस ठाण्यात आगामी महाविर जयंती, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती, हनुमान जयंतीच्या पार्श्वभूमीवर बुधवार ता.९ एप्रिल रोजी शांतता समीतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक काळे बोलत होते.बैठकीच्या अध्यक्षस्थानी उप जिल्हाधिकारी जीवराज डापकर, मंचावर तहसीलदार माधवराव बोथिकर, उप. विभागीय पोलिस अधिकारी डॉ समाधान पाटील,भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो, मौलाना शमिम रिझवी साब,मा.नगराध्यक्ष उत्तमरावजी कदम,प्रकाशदादा कांबळे, पालीकेचे प्रशासकीय अधिकारी शे. मुमतजीब,महावितरणचे अभियंता वसमतकर,पो.नि.विलास गोबाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.      

 यावेळी पुढे बोलताना काळे म्हणाले की,सण उस्तव जयंतीनिमित्त शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून,सार्वजनिक मिरवणुकीत हुल्लड बाजी करणा-या,दांगडू करणाऱ्यांची गय केली जाणार नाही.त्यांच्यावर प्रशासनाची करडी नजर राहणार आहे.सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे ही ते म्हणाले.यावेळी उपस्थित शांतता समीतीच्या सदस्यांनी तसेच जयंती महोत्सवाच्या सदस्यांनी सोई सुविधा तसेच अडीअडचणी मांडल्या.यावेळी भदंत उपगुप्त महाथेरो,डॉ समाधान पाटील, प्रकाश कांबळे, तहसीलदार बोथिकरांनी विचार मांडले.कार्यक्रमाचे प्रस्तावित आभार पो.नि.विलास गोबाडे यांनी तर सूत्रसंचालन जगदीश जोगदंड यांनी मानले.यावेळी शांतता समीतीच्या सदस्यांसह जयंती मंडळाचे पदाधिकारी सदस्य,व्यापारी, पत्रकार पोलिस पाटील आदीं मोठ्या संख्येने उपस्थित होते.

_____________________________

जयंती मिरवणुका सुरळीत पार पाडण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे .पालीका, महावितरण,आरोग्य विभाग, आदींना सर्वोपतरी सुचना दिल्या आहेत.मिरवणूक मार्गावर पिण्याच्या पाण्याची, विद्युत पुरवठा तसेच आयोग्य विभागाच्या पथकाची तसेच मोबाईल टाॅयलेटची व्यवस्था, रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची डागडुजी आदी कामे कटाक्षाने केली जातील.सण, उस्तव उत्साहात शांततेत सामीजीक बांधीलकी जोपासत साजरे करावेत.

-जीवराज डापकर

उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी गंगाखेड विभाग,प्रशासक न.प.पूर्णा

You cannot copy content of this page