शार्कसर्किटमुळे ६ एकरांंवरील ऊभा ऊस पेटला
- Uncategorized
- अन्य
- अर्थ समाचार
- कोरोना विशेष
- क्रीडा
- गुन्हा
- ठळक बातम्या
- ताज्या बातम्या
- देश-विदेश
- ब्रेकींग न्युज
- राजकीय

पूर्णा तालुक्यातील निळा येथिल घटना; ३०० टन ऊस जळून १० लाखांचे नुकसान;महावितरणच्या गलथान कारभाराचा फटका;लोंबकळणा-या तारांचा प्रश्न ऐरणीवर
पूर्णा(प्रतिनिधी)
तालुक्यातील मौजे निळा येथे (दि.२८) नोव्हेंबर रोज गुरुवारी सकाळच्या सुमारास शार्टसर्कीट होऊन ज्ञानोबा सुर्यवंशी,तुकाराम सुर्यवंशी यांच्या सह ओंकार सुर्यवंशी या तीन शेतकऱ्यांचा ६ एकर जमीनीवरील ३०० टन ऊस जळून राखरांगोळी झाल्याची घटना घडल्याचे उघडकीस आले आहे.घटनेत सदरील शेतकऱ्यांचे सुमारे १० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
पूर्णा येथिल महावितरण कंपनी तालुक्यातील विद्युत पुरवठा करणाऱ्या वाहीन्या मागील अनेक वर्षांपासून लोंबकळत असल्याच्या अवस्थेत आहेत.यामुळे तासांमध्ये घर्षण होऊन आग लागण्याच्या घटना वारंवार घडत आहेत.मात्र या लोंबकळणा-या तारांबाबत महावितरण प्रशासन कोणत्याही ठोस उपाययोजना करण्यासाठी धजावत नसल्याने दरवर्षी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे अर्थिक नुकसान होत आहे. तालुक्यातील मौजे निळा येथिल शेतकरी ज्ञानोबा गणपती सुर्यवंशी, तुकाराम गणपती सुर्यवंशी या भावंडांसह त्यांना लागुन ओंकार ज्ञानोबा सुर्यवंशी यांच्या मालकीची ६ एकर शेती आहे.काळी जमीन,उशाला असलेली पूर्णा नदी व परिसरात जवळच असलेल्या साखर कारखान्याच्या भरवशावर त्यांनी गतवर्षी नगदी पिकं म्हणून संपूर्ण ओलीताखालील ६ एकर जमीनीवर ऊसाची लागवड केली होती.त्यांच्या शेतात मधोमध महावितरण कंपनीचे ३३ केव्ही लाईनची विद्युत वाहींनी गेलेली आहे.मागील काही वर्षात या वाहीन्या लोबकळत असल्याने त्यांनी महावितरण कडे याबाबत वारंवार तक्रार करूनही महावितरण कंपनीच्या वतीने कोणत्याही प्रकारची दाद न दिल्याने त्यांना भिंती होती तिचं घटना शेवटी घडली.गुरुवार दि.२८ नोव्हेंबर रोजी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेतातून जाणाऱ्या विद्युत वाहीन्यात घर्षण होऊन त्याखाली ऊसाने पेट घेतला.आग लागल्याचे दिसून येताच शेतकऱ्यांनी आग विझवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु पहाता पहाता आगीने रौद्ररूप धारण करून संबंध ६ एकरांवर उभा ऊस आपल्या कवेत घेतला काही क्षणात या उसाची राखरांगोळी झाली.पिडीत शेतकऱ्यांनी घटनेची माहिती महसूल व महावितरण प्रशासनास देऊन नुकसान भरपाईची मागणी केली आहे.लोबकळत असलेल्या वाहीन्यांचा प्रश्न ऐरणीवर आला असुन
महावितरणने गलथान कारभार बाजुला ठेवून तातडीने यावर उपाययोजना करावी अशी मागणी शेतकरी वर्गातुन होत आहे.