मराठ्यांची पोरं अधिकारी झालेली पहायचेत-मनोज जरांगे(Manoj Jarange)
पूर्णा तालुक्यातील आलेगांव येथील हरिनाम सप्ताहास जरांगे पाटलांची हजेरी
पूर्णा(प्रतिनिधी)
माझ्या तमाम सकल मराठा बांधवांच्या पाठीब्यामुळे मागील अनेक वर्षांपासून मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी कशाचीच पर्वा न करता जिवाची बाजी लावून लढतोय.मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.माझ्या गरजवंत मराठ्यांची पोरं मला आरक्षणाच्या माध्यमातून अधिकारी झालेले पाहायचे आहेत.असे प्रतिपादन मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांनी केले आहे.
पूर्णा(Purna)तालुक्यातील आलेगाव सवराते येथे सुरू असलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता कार्यक्रमास आज बुधवारी (दि.२५) सकाळी ११ वाजेच्या सुमारास मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) बोलत होते.यावेळी जेष्ठ किर्तनकार हभप अच्युत महाराज दस्तापुरकर शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विशाल कदम व ग्रामस्थांनी यावेळी त्यांचे जंगी स्वागत केले.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले की,मराठा समाजासाठी आरक्षण मिळवून देण्यासाठी मी लढतोय, म्हणून सरकारने वेगवेगळी षड्यंत्र रचून मला जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला.परंतू,महाराष्ट्रातील माझ्या तमाम सकल मराठा बांधवांच्या एकजुटीमुळे त्यांचे षड्यंत्र हवेत विरले. हेच सरकारला पटत नाही. अनेक आव्हाने पेलून सरकारच्या विरोधात जाऊन तुमच्या पाठबळावर लढतो आहे. उपोषणे करुन माझे शरीर मला साथ देत नाही. मी मेलो तरी चालेल, परंतु माझे लाख वाचले पाहिजेत. समाजावर कोणतंही संकट येऊ द्या. मी ते परतवून लावण्यासाठी सदैव तत्पर आहे. समाजाची साथ मी मरेपर्यंत विसरणार नाही, अशी ग्वाही मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे-पाटील (Manoj Jarange) यांनी दिली.येत्या २५ जानेवारीरोजी अंतरवाली सराटी येथे पुन्हा आमरण उपोषणाला बसत आहे. तेथे लाखोंच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन त्यांनी उपस्थितांना केले