स्नेहसंमेलनामुळे शैक्षणासोबत मानसिक व शारीरिक विकास होतो- पो.नि.विलास गोबाडे
पूर्णा(प्रतिनिधी)…..
विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासाबरोबर त्याचा मानसिक व शारीरिक विकास घडवून आणण्यासाठी स्नेहसंमेलन महत्वाचे आहे. कारण सध्याचे युग स्पर्धेचे असुन त्यात खूप स्पर्धा आहे या स्पर्धेच्या युगामध्ये टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासाबरोबरच त्या शारीरिक वाढ होते त्यामुळे स्पंदन सारख्या स्नेहसंमेलनाचे आयोजन देखील तितकेच गरजेचे आहे.असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक विलास गोबाडे यांनी केले.
पूर्णा येथिल श्री गुरुबुद्धिस्वामी महाविद्यालयात तीन दिवसीय ‘स्पंदन २०२५’ वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.याचे उद्घाटन पूर्णा पोलीस निरीक्षक विलासजी गोबाडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी गोबाडे बोलत होते.कार्यक्रमाची सुरुवात हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद व कुस्तीपटू खाशाबा जाधव यांच्या प्रतिमा पूजनाने झाली. याप्रसंगी संस्थेचे कार्याध्यक्ष प्रमोदअण्णा एकलारे, सचिव अमृतराज कदम, सहसचिव गोविंदराव कदम संचालिका सौ.भाग्यलक्ष्मी प्रमोद एकलारे,सौ. स्मिता अमृतराज कदम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के.राजकुमार उपप्राचार्य डॉ.गजानन कुरुंदकर व डॉ. शिवसांब कापसे,प्रा.आबाजी खराटे,प्रा.मिटकरी विदयार्थी विकास कक्षाचे डॉ.विजय पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुढे बोलताना ते म्हणाले की,महाविद्यालयातील अनेक विद्यार्थी विभागीय स्तरावर आपल्या महाविद्याचे नाव लौकिक करत आहेत ही विशेष बाब आहे. स्नेहसंमेलनाच्या अनुषंगाने महाविद्यालयातर्फे वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत विद्यार्थ्यांच्या शारीरिक चाचण्या घेतल्या जातात त्यामध्ये त्यांना यशस्वी होण्यासाठी मदत होईल. यावेळी गोबाडे यांनी संस्थेचे कर्याध्यक्ष ,सचिव, महाविद्यालयाचे प्राचार्य विशेष कौतुकही केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. बरकुंडे यांनीअध्यक्षीय समारोप सचिव अमृतराज कदम कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डाफने तर आभार डॉ.व्यंकट कदम यांनी केले.