कोट्यावधी रुपये ढापणारे वानखेडे,मोडके बीडीओसह ७ दोषींना कुणाचे अभय..!
पूर्णा पंचायत समितीतील पेन्शन घोटाळा प्रकरण
पूर्णा/प्रतिनिधी
मागील पंधरा दिवसाखाली येथील पंचायत समिती कार्यालयाच्या लेखा विभागात सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन तसेच भविष्य निर्वाह निधी मध्ये सुमारे पावणे दोन कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण उघडकीस आले. या प्रकरणात पोलिसांनी लेखापाल संजय पाठक व सहा.लेखापाल मंचक भिसे यास बेड्या ठोकून गजाआड केले, मात्र घटनेस पंधरा दिवसांचा कालावधी लोटला असतानाही या प्रकरणातील कोट्यावधी रुपयांचा अफरातफर केलेले बडेमासे तत्कालीन बिडीओ श्रीमती सुनिता वानखेडे व जे. व्ही. मोडकेसह ७ जणांचा थांगपत्ता पोलिसांना लागत नसल्याने दोषींना नेमकं कुणाचे कुणाकडून अभय मिळत असल्याची जोरदार चर्चा ऐकायला मिळत आहे.
पूर्णा पंचायत समिती कार्यालयांतर्गत १ अक्टोबर २०२१ ते मे २०२३ पर्यंत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या पेन्शन तसेच भविष्य निर्वाह निधी योजनेमध्य तत्कालीन दोन गटविकास अधिकारी तसेच लेखापाल व काही कर्मचारी आणि खासगी व्यक्ती अशा नऊ जणांनी पेन्शन धारकांच्या १ कोटी ८३ लाख ७७ हजार ८४४ हजार रुपयांवर डल्ला मारल्याची घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशानुसार पंचायत समितीचे विद्यमान बीडीओ मयुर आंदेलवाड यांच्या विरोधात सहाय्यक लेखा अधिकारी संजय पाठक, वरिष्ठ सहाय्यक एम बी भिसे, तत्कालीन बिडीओ सौ एस के वानखेडे, तत्कालीन गटविअ जे व्ही मोडके, अरविंद नामदेव अहिरे, सोनाजी नामदेव भोसले, नागेश निळकंठ नावकीकर, जयश्री टेलरींग,शेख अहर शेख समद या नऊ जणांविरुद्ध विविध कलमाखाली दि.७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी दोषी संजय पाठक व मंचक भिसे हे दोघे न्यायालयीन कोठडीत आहे.घटना घडून जवळपास १५ दिवसांचा कालावधी लोटला आहे.मात्र या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन तत्कालीन बिडीओ सह ७ जणं पोलीसांना गुंगारा देत आहेत. सदरील दोषींची पाठराखण करण्यासाठी तालुक्यातील राजकीय पक्षांचे काही नेते आपलं वजन खर्ची घालत असल्याची चर्चा आहे.
कोट्यावधी रुपयांची संपत्ती..
पंचायत समितीच्या पेन्शन घोटाळ्यात दोषी आढळलेला लेखापाल संजय पाठक याचा जेमतेम पगार असताना तो मोठ्या तो-यात ड्युटीवर असायचा.महागड्या गाड्या वापराने, मौज मस्ती चैनीच्या वस्तू,,लाखों करोडो रुपयांची संपत्ती हे सर्वस्तृत आहे.त्यांने ही सर्व कशी आणी कुठून कश्या पद्धतीने गोळा केली यावर पंचायत समिती वर्तुळात प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मायापुंजीची चौकशी होणे गरजेचे…
शासकीय कार्यालयातील शासनाच्या पैशाची परस्पर विल्हेवाट लावणा-यांनी या घोटाळ्या सह शासनास आणखी किती रुपयाला गंडवले.प्रकरणात दोषी असलेल्या सर्वांनी आज पर्यंत किती मायापुंजी गोळा केली आहे.यांचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. दोषींना वा-यावर न सोडता पोलिसांनी त्यांना जेरबंद करावी अशी अपेक्षा सर्वसामान्य जनतेतून होत आहे.