रेल्वे रुळावर कंटेनर ट्रक; घातपाताची योजना का सहज घडलेली घटना हे मात्र समजेना..?
कंटेनर ट्रक सोडून चालक पसार; सारवाडी कोडी रेल्वे स्थानकादरम्यान तपोवन एक्सप्रेस समोरील प्रकार;
पूर्णा (प्रतिनिधी)
नांदेड मनमाड मार्गावर एक कंटेनर ट्रक ने रेल्वे रुळावर येऊन धावत्या रेल्वेची घटना आज शुक्रवार दिनांक ३१ जानेवारी रोजी जालना परतुर लोहमार्गावरील सारवाडी ते कोडी स्थानकादरम्यान घडली असून रेल्वे रुळावर कंटेनर ट्रक सोडून चालकाने घटनास्थळवरून पळ काढला आहे त्यामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक सह मुंबईकडून येणारी तपोवन एक्सप्रेस सुमारे एक तास खोळंबली होती. दरम्यान सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. रेल्वेतील काही जागरूक रेल्वे प्रवाशांनी सतर्कता दाखवत रेल्वे रुळावरील कंटेनर ट्रक हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली आहे.
मुंबईहून नांदेडच्या दिशेने निघालेली तपोवन एक्सप्रेस जालना स्थानक सोडल्यानंतर दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास जालना ते परतुर दरम्यानच्या लोहमार्गावरील सारवाडी ते कोडी रेल्वे स्थानकाच्या दरम्यान आली असता चालकाला रेल्वे रुळावर एक भला मोठा एम.एच.२१/डी/९२५७ नंबरचा कंटेनर ट्रक ऐन रेल्वे रुळावर थांबलेला असल्याचे निदर्शनास येतात तपोवन एक्सप्रेस च्या चालकाने प्रसंग अवधान राखून गाडीला तातडीचे ब्रेक लावले व गाडी ट्रकच्या समीप आणून लघु लग उभी केली दरम्यान अचानक ब्रेक मारल्याने रेल्वेमध्ये असलेल्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली गाडी का थांबली या विचाराने अनेक प्रवासी रेल्वे डब्यातून खाली उतरले दरम्यान रेल्वे रुळावर कंटेनर ट्रक उभारला असल्याने गाडी पुढे जाऊ शकत नसल्याचे प्रवाशांच्याही लक्षात आल्याने मग या प्रवासतील तसेच औरंगाबाद ते चुडावा प्रवास करणारे चुडावा पोलीस ठाण्यातील जमादार हीरक जैन हेही घटनास्थळाकडे धावून गेले त्यांनी सतर्कता दाखवत काही प्रवाशांना सोबत घेऊन एका वाहन चालकाला त्या कंटेनर ट्रक वर बसवून इतर प्रवासाच्या मदतीने रेल्वे रुळावर फसलेला कंटेनर ट्रक बाजूला केला. यानंतर रेल्वेतील प्रवाशांनी विश्वास सोडला त्यानंतर गाडी पुढील परतुर स्थानकाकडे रवाना झाली. तपोवन एक्सप्रेस चा चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधनामुळे या घटनेमुळे होणारी मोठी अपघाताची घटना तळली आहे.दरम्यान दरम्यान नांदेड मनमाड लोहमार्गावरील रेल्वे वाहतूक सुमारे एक तास कोळंबी होती सदरील रे कंटेनर ट्रक चालकाने हा ट्रक येथून रस्ता नसताना आणलाच कसा त्याच्या पाठीमागे नेमका कोणता उद्देश होता का .?रेल्वे चा अपघात तर घडून आणण्याचा त्याचा कट तर नव्हता ना हे मात्र नक्की समजू शकले नाही.