पूर्णेत रमाबाईं आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
शहरातील अश्वारूढ रथ, लेझिम पथकाच्या मिरवणुकीने वेधले लक्ष
पूर्णा(प्रतिनिधी)
येथील भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने रमाबाई आंबेडकर यांची १२७वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.रमाईच्या तैलचित्राची चांदीच्या स्थातून वा द्यवृंद लेझीम पथका सह पूर्णा शहराच्या मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली.
पूर्णेत रविवारी १६ रोजी पार पडलेल्या रमाई जयंतीकार्यक्रमाचे मार्गदर्शक उपगुप्त महाथेरो ,भंते पय्यावंश,अध्यक्ष स्थानी तुकाराम ढगे प्रमुख वक्त्या मांदेड येथील केंद्रीय शिक्षिका ॲड चित्रलेखा कांबळे प्रमुख पाहुणे डीआय खेडकर, आनंदा भेरजे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सकाळी डॉ. बाबासाहेबाच्या पुतळ्यास अभिवादन करून तुकाराम ढगे यांच्याहस्ते धम्मध्वजाचे करण्यात आले. डॉ आंबेडकर नगर येथे रमाई महिला मंडळाच्या हस्ते पंचशिल धम्म ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले भगवान गौतम बुद्ध व डॉ बाबासाहेबाच्या,माता रमाईच्या प्रतिमेस मान्यवरांच्या पुष्पहार अर्पण करून रमाईच्या तैलचित्राची चांदीच्या स्थातून वा द्यवृंद लेझीम पथका सह पूर्णा शहराच्या मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली त्या नंतर डॉ आंबेडकर चौक येथे धम्मसभेत रुपांतर करण्यात आले यावेळी यावेळी ॲड चित्रलेख कांबळे म्हणाल्या की रमाईचा स्वभाव शांत संयमी स्वाभिमानी होत्या आपली चार मुल औषधाविना मेली समाजातील मुलांसाठी स्वतःची दागिने विकून विद्यार्थ्याचा जेवणाची सोय केली पतीच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही वेगवेगळ्या आंदोलनात बाबासाहेबाच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या टाकल्या रमाई मुळे आज समाजातील महिला चांगल्या प्रकारचे जिवन जगत असल्याचे सांगितले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयंती मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.