Breking;भौतिकशास्त्राच्या पेपरला पकडले ४५ काॅपी बहाद्दर

Spread the love

पुर्णा व कावलगांव येथे शिक्षण विभागाच्या पथकाची कारवाई;परिक्षार्थ्यांच्या तपासणी प्रकार उघडकीस
पूर्णा(प्रतिनिधी)
इयत्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेला मागील आठवड्यात पासून प्रारंभ झाला आहे.शिक्षण विभागाच्या भरारी पथकांने पूर्णा तालुक्यातील कावलगांव येथिल जय जवान जय किसान महाविद्यालय तसेच शहरातील संस्कृती महाविद्यालयाच्या परिक्षा केंद्रावर सोमवारी १७  फेब्रुवारी रोजी भौतीकशास्त्र विषयाच्या पेपरला केलेल्या परिक्षार्थ्यांच्या तपासणीत कॉपी करताना तब्बल ४५ विद्यार्थ्यांना पकडल्याची माहिती विभागीय शिक्षण विभागाच्या सुत्रांनी दिली आहे.
       पूर्णा तालुक्यात मंगळवार ता.११ फेब्रुवारी पासून १२ वीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातील श्री गुरु बुद्धी स्वामी महाविद्यालय ,संस्कृती महाविद्यालय ,इंदिरा गांधी महाविद्यालय तसेच तालुक्यातील जय जवान जय किसान महाविद्यालय कावलगाव, हायटेक महाविद्यालय झिरो फाटा, जय किसान विद्यालय लिमला या सहा परिक्षा केंद्रावर एकूण १ हजार ८७६ विद्यार्थी परिक्षेला बसले असल्याची माहिती आहे . सोमवार ता.१७ रोजी भौतिकशास्त्र विषयाचा पेपर होता.दरम्यान तालुक्यातील कावलगांव,तसेच शहरातील परीक्षा केंद्रांवर शिक्षण विभागाच्या संजय ससाणे यांच्या पथकाने धाडी घालून परिक्षार्थ्यांची तपासणी केली.यामध्ये जय जवान जय किसान महाविद्यालयात पथकास एकुण २९ जणांना तर संस्कृती महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रांवर एकुण १६ असे एकूण ४५ काॅपी बहाद्दर विद्यार्थी काॅपी करताना आढळून आले.
सदरील विद्यार्थ्यांचे पेपर जप्त करुन पुढील कारवाई करीता बोर्डास पेपर पाठवण्यात आले असल्याची माहिती आहे.
उपाययोजनेतंतर आढळले कॉपी बहाद्दर
बारावीच्या परीक्षेदरम्यान कॉपीचे प्रकरणे घडू नये अशा अनुषंगाने विभागीय शिक्षण मंडळाने सिसीटीव्ही,ड्रोन कॅमेरे ,बैठे पथक, भरारी पथक कडेकोट बंदोबस्त अशा विविध उपाययोजना केल्या आहे. याशिवाय बोर्डाने ही भरारी पथके गठीत केलेली आहेत.विशेष म्हणजे यंदा जे परिक्षा केंद्र आहे त्या परिक्षा केंद्रावर येथिल एकही कर्मचारी पाणी वाटप करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही नो एन्ट्री आहे.त्यांना ईतर ठिकाणी पाठवण्यात आले आहे.सोबतच परीक्षार्थीना चप्पल-बूट बाहेरच काढावे लागत असतांना कॉपी करतांना विभागात परीक्षेच्या भौतिक शास्त्र पेपरला तब्बल ४५ प्रकरणे उघड झाल्यानंतर शिक्षण विभागाच्या वतीने परिक्षेसाठी दाखवत असलेला बडेजाव कीती पोकळ आहे हे उघडकीस आले आहे.एकंदरीतच शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

You cannot copy content of this page