ऊसाचा ट्रॅक्टर अडवून शेतकऱ्यांस चार जणांनी बदडले
पूर्णा तालूक्यातील कावलगाव वाडी येथील घटना;चुडावा पोलिसात गुन्हा दाखल!
पूर्णा/प्रतिनिधी:तालूक्यातील कावलगाव वाडी येथे एका शेतक-यास ता २८ फेब्रुवारी रोजी रात्री गावातीलच चार गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी ऊसाने भरलेले ट्रॅक्टर वाहतूक करताना रस्त्यात अडवून खाली उतरवून लोखंडी रॉडने मारहाण केली व जिवेमारण्याची देत ट्रॅक्टर हेडची मोडतोड करुन हवा सोडून देत ऊस वाहतूक करणे अडवून धरली.सदर घटनेची सबंधीत शेतकऱ्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चुडावा पोलिस ठाण्यात चार जणा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अधिक माहिती असी की, पूर्णा तालूक्यातील कावलगाव वाडी येथील फिर्यादी शेतकरी प्रकाश किशनराव शेळके ( वय ४२ वर्ष)हे त्यांचा पुतण्या बालाजी शेळके यांच्या सोबत शेतातील गट क्रमांक ११२ मधील ऊस तोडून स्वतःच्या ट्रॅक्टर हेडला ट्रॉली लावून त्यात ऊस भरुन ता २८ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजेदरम्यान धानोरा मोत्या गावाकडे जाणा-या रोडवर भवानी मातेच्या मंदिरा जवळ येताच गावातील भावकीचे दंडेलशाही करणारे गुंड प्रवृत्तीचे रामदास एकनाथ शेळके, गिरधारी परसराम शेळके, नरहरी नागोराव शेळके,परसराम नागोराव शेळके यांनी संगनमत करुन फिर्यादी प्रकाश शेळके व त्यांचे पुतणे बालाजी शेळके यांच्यावर दंडेलशाही करुन खाली उतरवून १८७ गटामधील शेताचा कोर्टात चालू असलेला वाद मिटवून घे नाहीतर तूला जिवेमारुन टाकतो,असी धमकी देऊन लोखंडी रॉडने मारहाण करुन ट्रॅक्टरची मोडतोड करीत टायरची हवा सोडून देत ऊस वाहतूक करणे अडवून धरली.त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस ट्रॅक्टरमध्य तसाच वाळून जात आहे.दरम्यान, शेतकरी प्रकाश शेळके यांच्या फिर्यादीवरून तपासानंतर काही चुडावा पोलिस ठाण्यात रामदास शेळके, गिरधारी शेळके, नरहरी शेळके,परसराम शेळके या चौघा विरुद्ध विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शिवाय, शेतकरी प्रकाश शेळके यांनी मागील पंधरा दिवसाखाली शुध्दा सदर आरोपींनी शेतातला ऊस तोडून नेवू देणार नाहीत म्हणून धमकी दिल्याची तक्रार ठाण्यात दिली होती.परंतू,चुडावा पोलिसांनी आरोपींना पोलीस खाक्या न दाखवल्यामुळे निर्ढावलेल्या चौघा आरोपींनी सबंधीत फिर्यादी शेतकऱ्यास मारहाण करुन ऊसाची वाहतूक थांबवण्याचे धाडस केले आहे.या घटनेमुळे गुंड प्रवृत्तीच्या लोकांची गुन्हेगारी बळावत असल्याचे नागरीकातून बोलले जात आहे.त्याच बरोबर पोलीसांच्या निष्क्रियते मुळे कावलगाव व परिसरातील गावात अवैध देशी दारु विक्रीचा व्यवसाय मागील अनेक महिन्यापासून चालू असल्याची ओरड महिला नागरीकातून केली जात आहे.