शेतकऱ्यांची कर्जमाफी,दिव्यांग्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास चक्काजाम आंदोलन -बच्चु कडू
पूर्णेत बच्चू कडूंच्या उपस्थितीत प्रहारचा प्रचंड मेळावा
पूर्णा/प्रतिनिधी
राज्यातील फडवणीस सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी तसेच घरकुल लाभार्थ्यांचे प्रश्न व दिव्यांगाचे प्रश्न सोडवण्याचा सोडवण्यासाठी तातडीने निर्णय घ्यावे अन्यथा यापुढे जाऊन प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने राज्यभर चक्काजाम आंदोलन वेळ पडल्यास करावे लागेल असे आवाहन राज्याचे माजी मंत्री प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चू कडू यांनी केले.
पूर्णा शहरात मा राज्यमंत्री तथा आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली प्रहार संघटनेच्या वतीने घरकुल हक्क परिषद व शेतकरी संपूर्ण कर्जमाफी या प्रमुख मागण्यांसाठी भव्य मेळाव्याचे १८ एप्रिल रोजी शहरातील राजारामबापू सभागृह जुना मोढा येथे आयोजन करण्यात आले.मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी बच्चु बोलत होते.
यावेळी मेळाव्यातून विविध मागण्या करण्यात आल्या दिव्यांग नागरिकांना दरमहा ६००० भत्ता देण्यात यावा दिव्यांग, निराधार, विधवा व परितक्त्या महिलांना घरकुल योजनेत प्राधान्य मिळावे.भूमिहीन बेघर दिव्यांग बांधवांना एक गुंठा जागा घरकुलासाठी विनामूल्य उपलब्ध करून द्यावी.घरकुलासाठी प्रती लाभार्थी ५ लाख इतका निधी द्यावा, तसेच शहर व ग्रामीण भागांना समान निधी देण्यात यावा. दिव्यांगां साठी १०लाखांची आरोग्य विमा पॉलिसी शासनाने लागू करावी.दिव्यांगांना व्यवसायासाठी ग्रामपंचायतीमार्फत जागा उपलब्ध करून द्यावी.घरकुलासाठी मोफत रीतसर जागा शासन आदेशानुसार वितरित करावी.पेरणीपासून ते कापणीपर्यंतची सर्व शेती कामे रोजगार हमी योजनेअंतर्गत समाविष्ट करावीत.शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी व सातबारा उतारा कोरा करावा.रोजगार सेवक व ग्रामपंचायत रोजगार सेवकांना सेवेत सामावून घ्यावे.शेतीमाल हमीभावाने खरेदी करण्यात यावी, तसेच हमीभावाने खरेदी न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.या आंदोलनाद्वारे समाजातील दुर्बल, वंचित व दिव्यांग घटकांचे हक्क सुनिश्चित करण्याची जोरदार मागणी करण्यात आली. त्यावेळी जिल्हाप्रमुख शिवलिंग बोधने, तालुकाप्रमुख शिवहार सोनटक्के, शहरप्रमुख संजय वाघमारे, रोफ कुरेशी विष्णूभाऊ बोकारे, बळीराम गुंडाळे, विठ्ठल जोगदंड, श्रीहरी इंगोले, बबन ढोणे, उमाजी हातागळे, शहाजी देसाई, रामभाऊ गाडेकर, बाबाराव देशमाने, नाना आंबोरे, विनायक बोकारे, मदन भोसले, सचिन सोनकांबळे यांच्यासह प्रहार जनशक्ती पक्षाचे असंख्य पदाधिकारी, कार्यकर्ते, पूर्णा शहरासह तालुक्यातील शेतकरी व दिव्यांग बांधव महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित जनसमुदायास संबोधीत करताना आ.बच्चू कडू म्हणाले की,शासनाच्या धोरणावर ,तसेच निवडणूक आयोगावर सडकून टीका केली.तसेच समाजातील दिव्यांग, शेतकरी, विधवा भगिनी आणि वंचित घटक हे नेहमीच दुर्लक्षित राहिले आहेत. त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. सरकारने फक्त आश्वासने न देता, प्रत्यक्ष कृती करावी. आम्ही जे मुद्दे मांडले आहेत, ते राजकारणा साठी मांडले नाहीत ते समाजहितासाठी आहेत. जर शासनाने लवकरात लवकर यावर ठोस निर्णय घेतला नाही, तर आम्ही पुढील टप्प्यात अधिक तीव्र आंदोलन छेडू. आम्हाला संघर्ष करावा लागला तरी चालेल, पण गरिबांच्या छपराचं स्वप्न आम्ही पूर्ण करूनच थांबू.असंही बच्चु कडू म्हणाले