जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी खा.बंडु जाधव पोहोचले तहसील कचेरीत
पूर्णा(प्रतिनिधी )
परभणी जिल्ह्याचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकप्रिय खासदार संजय ऊर्फ बंडू जाधव पूर्णा तालुक्यातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी थेट तहसील कचेरीत पोहोचले.त्यांनी उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांची भेट घेऊन सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करुन कामे मार्गी लावावीत असे आवाहन केले.
सर्वसामान्य नागरिकांची अनेक प्रशासकीय कामे काही अडचणींमुळे होत नाहीत. जनतेने निवडून दिलेले लोकप्रतिनिधीही त्यांच्या कामात लक्ष घालत नाहीत.जनतेच्या कामांसाठी सदैव तत्पर असलेले परभणी जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार हे मात्र याला अपवाद ठरताना दिसत आहेत.खा.जाधव हे ठाकरे गटाचे दबंग खासदार म्हणून सुपरिचित आहेत.सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. खा.जाधव हे बुधवारी २१ रोजी पूर्णा तालुक्याच्या दौऱ्यावर होते.यावेळी त्यांना तालुक्यातील काही नागरिक मतदार आपल्या प्रलंबित असलेल्या कामांसाठी भेटले.त्यांनी यावेळी कोणताही विलंब न करता जनतेच्या रखडलेली कामे मार्गी लावण्यासाठी थेट तहसील कार्यालय गाठले.यावेळी त्यांनी समृद्धी महामार्गात जमीन गेलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न, घरकुल धारकांचा वाळू प्रश्न, निराधार योजनेतील लाभार्थ्यांचा प्रश्न, फेरफार, शेत,शिव पांदण रस्ते ,याबाबत प्रशासनाच्या अधीका-यांशी चर्चा करुन तातडीने समस्या सोडविण्यात याव्यात असे आवाहन प्रशासनाला केले.यावेळी काहीं नागरिकांची रखडलेली कामे देखील तातडीने मार्गी लागली आहेत.यावेळी तहसील कार्यालयात उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर ,तहसीलदार माधवराव बोथिकर ,नायब तहसीलदार प्रशांत थारकर, नायब तहसीलदार कृष्णाजी मस्के आदी विभागांचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.तर खा.जाधव यांच्या समवेत उपजिल्हा प्रमुख दशरथ भोसले, शहरप्रमुख मुंजाभाऊ कदम, नगरसेवक श्याम कदम, प्रमोद ऊर्फ राजु एकलारे, बालाजी वैद्य,प्रा.गोविंद कदम ,बंडुअप्पा बनसोडे, विकास वैजवाडे, शंकर गलांडे, मनोज उबाळे, गजानन हिवरे, साहेबराव कल्याणकर, मुन्ना राठोड,रौफ कुरेशी,अमजद भाई,,राजु माने नागेश बर्दापुरे,आदींची प्रमुख उपस्थिती होती.