पूर्णेत ‘सस्ती अदालत’ उपक्रमांतर्गत ४४ प्रकरण निकाली

Spread the love

 पूर्णा/ प्रतिनिधी

  • शेत रस्ते,पांदण रस्ते,शिव रस्त्यांसाठी गावोगावच्या शेतकऱ्यांत असलेले वाद सामोपचाराने मिटवून रस्ते मोकळे करण्यासाठी शासनाच्या वतीने तालुका स्तरांवर सुरु केलेल्या ‘सस्ती अदालत’ उपक्रमांतर्गत शुक्रवारी २३ में रोजी पूर्णा तालुक्यातील तब्बल ४४ प्रकरणे निकाली काढण्यात महसूल प्रशासनाला यश आले असल्याची माहिती तहसीलदार माधवराव बोथिकर यांनी दिली आहे.

       पूर्णा तालुक्यातील चुडावा,लिमला, कावलगांव, पूर्णा,ताडकळस,कात्नेश्वर या ६ महसूल मंडळातील रखडलेल्या शेत रस्त्यांबाबत तोडगा काढण्यासाठी उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली  शुक्रवारी २३ में रोजी ‘सस्ती अदालतीचे’ आयोजन करण्यात आले होते.यावेळी मागील ५६ प्रकरणांसह नवे ८१ प्रकरण असे एकूण ११० प्रकरणे सुनावणीसाठी ठेवण्यात आली होती. त्यापैकी ४४ प्रकरण तडजोडी अंती निकाली काढण्यात आली आहेत. आयोजित अदालत  तहसीलदार माधवराव बोथिकर, यांच्या नेतृत्वाखाली सकाळी ९ वाजता सुरू करण्यात आली होती.नायब तहसीलदार प्रशांत थारकर, कृष्णाजी मस्के,पांडुरंग शिंदे, मंडळ अधिकारी,बी.एस.लटपटे,एस.ए.खुणे,के.पी.शिंदे,श्रीमती शेलगांवकर,घोडके, यांनी काम पाहिले.तर “सस्ती अदालत” यशस्वीतेसाठी व्यंकटेश जजरवार,तलाठी गणेश गोरे, सुभाष राऊत,सिद्धोधन खिल्लारे,सुधाकर राठोड , कोतवाल मुरली मोरे, आदींनी परिश्रम घेतले. यापुर्वीही येथील महसूल विभागामार्फत ९ में रोजी ‘सस्ती अदालतीत ‘एकूण ३३ प्रकरणांवर सुनावणी करण्यात आली होती.त्यात तडजोडी अंती एकूण १२ प्रकरणे निकाली काढण्यात आली होती.आजपर्यंत तालुक्यातील ५६ शेत,पांदण,शिव रस्त्याचे प्रकरण ‘सस्ती अदालतीत’ निकाली काढण्यात आली असून,जवळपास ३४ प्रकरणं स्थळं पाहणीसाठी राखीव ठेवण्यात आली असल्याचे तहसीलदार माधवराव बोथिकर यांनी सांगितले आहे.

You cannot copy content of this page