वंचितचे निवेदन; पालीकेवर बोंबाबोंब मोर्चा काढण्याचा ईशारा
पूर्णा(प्रतिनिधी)
वंचित आघाडीच्या वतीने सोमवारी २६ मे रोजी पालीकेचे मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.चार दिवसांत तोडगा न निघाल्यास बोंबाबोंब मोर्चा काढण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.
पुर्णेतील वंचित बहुजन आघाडीच्या सुनील मगरे,राज नारायणराव,रवि वाघमारे,नागेश भैय्या एंगडे,माधवराव भगत,शामभाऊ खंदारे आदींनी सोमवारी पालीकेत मुख्याधिकारी उत्कर्ष गुट्टे यांची भेट घेऊन आपल्या मागण्यांचे निवेदन दिले.निवेदनात शहरात सर्वत्र पसरलेला केरकचरा, नालेसफाई अचानक वाढ केलेल्या भरमसाठ करवाढीच्या व इतर बोगस व निकृष्ट दर्जाच्या कामांबाबत शहर खड्डेमय शहर बनले आहे.अनेक महीन्यात पासुन शहरात साफसफाई होत नसल्याने ठिकठिकाणी गटारे तुंबलेल्या अवस्थेत आहेत.शहरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.नागरिकांना पिण्याचे स्वच्छ पाणी पुरवठा होत नाही.यामागण्यांचे निवेदन दिले.मुख्याधीका-यांनी चार ते पाच दिवसांच्या आत मागण्या पूर्ण करण्यात येतील असे सांगितले आहे.मागण्या वेळेत मान्य न झाल्यास पालीकेवर बोंबाबोंब मोर्चा काढण्याचा इशाराही वंचित आघाडीच्या वतीने निवेदनात नमूद केले आहे.