प्रशासनाच्या जनता दरबारात पालकमंत्री मेघनाताई बोर्डिकरांचा फोन खनखनला
पूर्णा तालुक्यातील मौजे रुंज येथे सुरू होता जनता दरबार; ग्रामस्थ सुखावले
परभणी(प्रतिनिधी)
पालकमंत्री टास्क फोर्स अंतर्गत रुंज गावात सुरु असलेल्या ऐन जनता दरबार जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांनी गाव दत्तक दिलेल्या अधिकारी नायब तहसिलदार प्रशांत थारकर यांच्या भ्रमणध्वनी फोन करून आढावा घेत ग्रामस्थांशी संवाद साधत अडीअडचणी जाणून घेतल्या उर्वरित कामे तातडीने मार्गी लावावीत असे सांगितले.
परभणी जिल्ह्यात पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर साकोरे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने गावपातळीवर जाऊन ग्रामस्थांच्या अडचणी सोडवून आदर्श गाव करण्याचे लक्ष डोळ्यासमोर ठेवून जिल्ह्यात टास्क फोर्स माध्यमातून प्रत्येक अधिकाऱ्यांना “एक गाव दत्तक” दिले आहे .या उपक्रमा अंतर्गत पूर्णा तालुक्यात एकूण १० गावे निवडण्यात आली असून,स्थानिक अधिकाऱ्यांना कडून तेथील अडचणींचा निपटारा करण्यासाठी बाबत मसुदा तयार केला आहे.या टास्क फोर्सवर पालकमंत्री मेघनाताई बोर्डीकर ह्या जातीने लक्ष घालून आहेत.मंगळवारी २७ रोजी नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यातील मौजे रुंज गावात शासनाच्या प्रत्येक विभागातील प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी यांच्या उपस्थितीत जनता दरबार आयोजित केला होता. यावेळी प्रशासनातील अधिकारी कर्मचारी, गाव पुढारी ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी केलेल्या तक्रारींच्या अर्जाच्या अनुषंगाने तसेच आरोग्य, महावितरण, कृषी, शिक्षण, पाणी पुरवठा,पांदण रस्ते, संजय गांधी निराधार,किसान आदीं योजनांतील प्रलंबित लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला.तर उर्वरित कामांबाबत आढावा घेण्यात आला.दरम्यान जनता दरबार सुरू असतानाच थारकर यांच्या मोबाईलवर पालकमंत्र्यांचा फोन खनानल्याने उपस्थित ग्रामस्थ अवाक झाले. फोनवरून त्यांनी गावकऱ्यांसोबत चर्चा करुन सर्व आढावा घेतला.ग्रामस्थांच्या उर्वरित अर्जावर, तसेच सार्वजनिक समस्या सोडविण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना दिल्या. पालकमंत्र्यांनी सुरू केलेल्या या उपक्रमावर पालकमंत्री जातीने लक्ष घालत आहेत.गावातील नागरिकांचाही यास चांगला प्रतिसाद लाभत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.