माता रमाई सारख्या कर्तृत्ववान महिला देशात निर्माण व्हायला हव्यात- प्रकाश कांबळे.
पूर्णा/प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नी म्हणून रमाई ने केलेल्या त्यागास इतिहासात तोड नाही.माता रमाईच्या जीवनाची यशोगाथा ही भारतीयमहिलांना प्रेरणादायी आहे.एव्हढेच नव्हे तर भारतीय इतिहासात बहिणाबाई चौधरी,पंडिता रमाबाई आदि मूठभर महिला असतील ज्यांची इतिहासाने दखल घेतली.त्यात माता रमाईआणि बहिणाबाई यांच्या कार्य कर्तृत्वाने त्या देशात आदर्श महिला ठरल्या.शेकडो लेखकांनी त्यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारे हजारो लेख लिहिले तर अनेकांनी त्यांच्यावर मोठमोठे ग्रंथ,कादंबरी,नाटक आदि साहित्य निर्माण केले.अशा कर्तृत्ववान महिला देशात निर्माण व्हायला हव्यात.अशा आशावाद रिपाई नेते प्रकाश कांबळे यांनी व्यक्त करीत केला.
पूर्णा येथील सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृहात २७ मे रोजी माता रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृती दिनाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमास पूज्य भदंत पय्यवंश, आणि भिक्खु संघाची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निरंजना महिला मंडळाच्या शोभाताई कांबळे ह्या होत्या. प्रास्ताविक पूर्णा न.प .चे गट नेते उत्तम खंदारे यांनी त्याग मुर्ती रमाई यांचे स्मृतीगीत गाऊन त्यांना अभिवादन केले. तर ऍड.हर्षवर्धन गायकवाड, ॲड.धम्मदीप जोंधळे, सामाजिक कार्यकर्ते दादाराव पंडीत, सुप्रसिद्ध लेखिका ज्योती धुत्मल पंडीत यांनी माता रमाईंच्या जीवनावर उजाळा दिला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शहरातील सर्व महिला मंडळे,जयंती मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन श्रीकांत हिवाळे यांनी केले.