रेल्वे प्रवाशांच्या खिशाला कात्री,१ जुलैपासून प्रवास महागणार
संपादकीय/(ता.२५ जुलै )Indian Railways’ Passenger Fare Hike: भारतीय रेल्वे १ जुलै २०२५ पासून नवीन भाडे दर लागू करणार आहे, त्यामुळे सामान्य आणि लांब पल्ल्याच्या प्रवाशांना थोडा जास्त खर्च करावा लागणार आहे.मात्र, काही श्रेणींमध्ये भाडेवाढ करण्यात आलेली नाही, ही दिलासादायक बाब आहे.
इकॉनॉमिक टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले आहे की, नॉन-मेल किंवा एक्सप्रेस गाड्यांचे भाडे प्रति किलोमीटर १ रुपये वाढवले जाणार आहे, तर एसी क्लाससाठी प्रति किलोमीटर २ पैशांनी वाढ केली जाणार आहे. कोरोना साथीनंतर पहिल्यांदाच रेल्वेने भाड्यात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याचा लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर मोठा परिणाम होऊ शकतो. ‘या’ तिकिटांवर होणार नाही कोणताही परिणाम – वृत्तानुसार, ५०० किमीच्या प्रवासासाठी उपनगरीय तिकिटांच्या आणि द्वितीय श्रेणीच्या तिकिटांच्या भाड्यात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.तथापि, जर प्रवास ५०० किमीपेक्षा जास्त असेल तर ही वाढ प्रति किलोमीटर अर्धा पैसे दराने लागू होईल. याशिवाय, मासिक हंगामी तिकिटातही कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. (हेही वाचा -Tatkal Ticket Booking Aadhaar Rule: तत्काळ तिकिटांसाठी आधार प्रमाणीकरण अनिवार्य; १ जुलै २०२५ पासून नियम लागू) कोणत्या रेल्वे गाड्यांमध्ये भाडे वाढ होणार?AC क्लास: एसी तिकिटांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे. आता तुम्हाला प्रति किलोमीटर २ पैसे जास्त द्यावे लागतील.जनरल सेकंड क्लास: जर तुम्ही ५०० किलोमीटरपर्यंत प्रवास करत असाल तर भाड्यात कोणतीही वाढ होणार नाही. परंतु, जर तुमचा प्रवास ५००किलोमीटरपेक्षा जास्त असेल तर तुम्हाला प्रति किलोमीटर अर्धा पैसा जास्त द्यावा लागेल. मेल/एक्सप्रेस ट्रेन (नॉन-एसी): जर तुम्ही मेल/एक्सप्रेस ट्रेन गाड्यांमध्ये प्रवास केला तर तुम्हाला प्रति किलोमीटर १ पैसे जास्त द्यावे लागतील. तत्काळ तिकिटांच्या नियम बदल – दरम्यान, जूनच्या सुरुवातीला भारतीय रेल्वेने तत्काळ तिकिटांच्या नियमांमध्ये अनेक महत्त्वाचे बदल केले होते, जे १ जुलै २पासून लागू होणार आहेत. रेल्वेने तत्काळ तिकिट बुकिंगसाठी आधार अधिकृतता अनिवार्य केली आहे. रेल्वे मंत्रालयाने जारी केलेल्या सूचनांनुसार, सर्व झोनना कळविण्यात आले आहे की या नवीन नियमाचा उद्देश तिकिटांचा काळाबाजार थांबवणे आहे. तथापी, आता वापरकर्त्यांना तत्काळ तिकिट बुकिंगसाठी आधार आधारित ओटीपी पडताळणी पूर्ण करावी लागेल.