जीव गेला तरी बेहत्तर पण शक्तीपीठ मार्गासाठी जमीन देणार नाही
परभणीत जमीन अधिग्रहण मुद्दा पेटला;पोखर्णी येथे पार पडलेल्या जिल्हा समन्वय समीतीच्या बैठकीत शेतकऱ्यांचा एकमुखी निर्णय परभणी ता.२८(प्रतिनिधी)परभणीत प्रस्तावित नागपूर-कोल्हापूर(शक्तीपीठ मार्गाच्या जमीन अधिग्रहणाचा मुद्दा पेटला असून, ता.२७ नृसिंह पोखर्णी येथे पार पडलेल्या जिल्हा समन्वय समीतीच्या बैठकीत शेतकऱ्यांनी आमचा जीव गेला तरी बेहत्तर परंतु एक इंच भर जमीनी अधिग्रहीत करु देणार नसल्याचा एकमुखी निर्णय महामार्गात शेत जमीन जात असलेल्या शेतकऱ्यांनी घेतला आहे.. शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन अधिग्रहण करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून या निर्णयाला परभणी जिल्ह्यात शेतकऱ्यांतून विरोध होत आहे. तसेच संयुक्तीक जमीन अधिग्रहण करू दिली जाणार नाही, प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार, मोजणी अधिकाऱ्यांनी जबरदस्ती केल्यास त्याच भाषेत उत्तर देणार आदी निर्णय या बैकीत घेण्यात आले. जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ३१ गावांतील बाधित शेतकरी या बैठकीला उपस्थित होते. १ जुलैपासून महामार्गाची प्रत्यक्ष मोजणी सुरू होणार असून ती उधळून लावण्याची रणनीती या बैठकीत ठरविण्यात आली. महामार्गासाठी परभणी जिल्ह्यातील १,५०० ते १,५२५ एकर एवढी जमीन अधिग्रहण केली जाणार आहे. यात एकूण ३ हजार ८३९ शेतकऱ्यांच्या जमिनी बाधित होणार आहेत. तर १,५०० ते २,००० शेतकऱ्यांनी या विरोधात आक्षेप नोंदवले आहेत.या बैठकीस गोविंद घाटोळ, शांतीभूषण कच्छवे, विजयराव बेले, अमृतराव शिंदे, अँड. माधुरी क्षीरसागर, सोनाली देशमुख, उर्मिला पवार, सतीशराव घाडगे आदींसहीत शेतकरी उपस्थित होते.