सामाजिक कार्यकर्ते शहाजी सुर्यवंशी यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन!

Spread the love

नांदेडकडे प्रवास करताना राजाराणी एक्स्प्रेस रेल्वे डब्यात आला होता हृदयविकाराचा झटका

गौर/ प्रतिनिधी: येथून जवळच असलेल्या व पूर्णा
तालूक्यातील सोनखेड (मोठी पांढरी) येथील रहिवासी व धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते शहाजी शंकरराव सुर्यवंशी (वय ५५) यांचे ता.६ डिसेंबर रोजी रात्री ७:३० वाजता मुंबई येथील सिएसटी स्टेशनवरून राजाराणी रेल्वे एक्स्प्रेसने मित्रा सोबत नांदेड प्रवास करताना डब्यात त्यांना अचानक अस्वस्थ वाटून दरदरुन घाम येत हृदयविकाराचा झटका आला.या दरम्यान त्यांच्या सोबत असलेल्या मित्राने परेल रेल्वे स्टेशन येथे उतरुन त्या भागातील जवळील दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले परंतू त्यांची रात्री ८:४५ वाजे दरम्यान प्राणज्योत मावळली.या घटनेमुळे सोनखेड पांढरी गावावर एकच शोककळा पसरली आहे.शहाजी पाटील सुर्यवंशी यांची पूर्णा तालूक्या बरोबरच नांदेड वसमत भागात एक मनमिळाऊ वृत्तीचे आणि धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते म्हणून ख्याती होती.त्यांची मुलगी कु.खुशी ही मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण घेत होती.तिस भेटण्यासाठी कै.शहाजी पाटील व त्यांचे एक नांदेडचे मित्र हे दोघेजण ६ डिसेंबर रोजीच्या आधी गेले होते.मुलीला भेटून ते रेल्वेने नांदेडकडे येत असताना ६ डिसेंबर रोजी रात्री राजाराणी एक्स्प्रेस मध्य प्रवासात ही घटना घडली असल्याची माहिती त्यांचे मावश भाऊ बाबाराव डाखोरे यांनी दिली.त्यांचा पार्थिव देह मुंबई येथून रुग्णवाहिकेतून सोनखेड पांढरी येथे आणला जात असून आज ता.७ डिसेंबर शनिवार रोजी ८:३० ते ९ वाजे दरम्यानत्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगी कु.खुशी,मुलगा कार्तिक,आई,भाऊ,चुलते,पुतने,पुतणी असा मोठा परिवार असून ते प्रगतशील शेतकरी ज्ञानेश्वर सुर्यवंशी यांचे बंधू तर प्रा.बालाजी डाखोरे यांचे मावश भाऊ आणि सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक रामराव गाडेकर यांचे जावई होत.या पूर्वी मागील काही वर्षाखाली त्यांचे बंधू पंचायत समितीचे सभापती सुभाषराव सुर्यवंशी यांचे कार अपघातात निधन झाल्यामुळे शहाजी पाटील यांचे मनोबल खचले असताना आता त्यांच्यावरही निसर्गाने अकाली घाला घातला.या‌ धक्कादायक घटनेमुळे पूर्णा व नांदेड परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page