विद्युत वाहीन्यांत घर्षण,उभा ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी
पूर्णा-झिरोफाट्यावरील घटना; शेतकऱ्यांचे सुमारे
पूर्णा(प्रतिनिधी)
तालुक्यातील महावितरणच्या ढिसाळ नियोजनामुळे कमकुवत व लोंबकळत असलेल्या विद्युत वाहीन्यांत घर्षण होऊन शेतातील पिके जळून नष्ट होत असल्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.रविवार दि.१२ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास पूर्णा शिवारातील एका शेतकऱ्यांच्या शेतातील अडीच एकरातील उभा ऊस विद्युत वाहीन्यात घर्षण होऊन लागलेल्या आगीच्या भक्ष्यस्थानी सापडून शेतकऱ्यांचे सुमारे साडेचार चार लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.घटनेची नोंद पूर्णा पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की शहरापासून जवळच बाबाराव नागोराव कदम रा.पूर्णा यांची पूर्णा-झिरोफाटा रस्त्यावरील पूर्णा शिवारात गट नंबर ११४/२/१ मध्ये १२ एक्कर शेत जमीन आहे.त्यांनी आपल्या ५ एकर जमीनीवर गतवर्षी ऊसाची लागवड केली होती.रविवारी सकाळच्या सुमारास त्यांच्या शेतातून गेलेल्या विद्युत वाहीन्यांच्या तासांमध्ये प्रचंड घर्षण होऊन आगीची चिंगारी ऊसात पडली.तारांखालील ऊसाने पेट घेतला पहाता पहाता आगीने आपल्या कवेत अडीच एकर ऊस आपल्या कवेत घेतला आगीची घटना लक्षात येताच स्थानिकांनी अग्नीबंब बोलाऊन तातडीने आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला आहे.
गतवर्षी देखील विद्युत मंडळाच्या वाहीन्यामुळे याच शेतकऱ्यांचा ऊस जळून लाखों रुपयांचे नुकसान झाले होते .महावितरण कपनीने संबंधित शेतकऱ्याने विद्युत वाहीन्यांबाबत वारंवार तोंडी लेखी तक्रार करुनही महावितरणने अर्जाला केराची टोपली दाखवल्या मुळे पुन्हा एकदा त्या जागेवर त्याच शेतकऱ्यांचा अडीच एकरातील सुमारे ४ ते साडे चार लाख रुपयांचा ऊस जळून खाक झाला आहे.याबाबत संबंधित शेतकऱ्याने पूर्णा पोलिस ठाण्यात अकस्मात जळीत प्रकरणी नोंद करण्यात आली आहे.
विद्युत वाहीन्यांत घर्षण होऊन लागत असलेल्या आगीमुळे शेतकऱ्यांचे लाखों रुपयांचे नुकसान होत आहे.महावितरण कंपनीच्या अधीका-यांनी खराब झालेल्या कमकुवत लोंबकळत असलेल्या विद्युत वाहीन्यांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.