संत रोहिदास महाराजांचे विचार अनुकरणीय-चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष गायकवाड
पूर्णेत संत शिरोमणी रहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
पूर्णा(प्रतिनिधी)
चौदाव्या शतकात जन्म झालेल्या संत रोहिदासांनी मांडलेले समतेचे विचार आजही प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरतात असे प्रतिपादन राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड यांनी केले.
पूर्णा शहरातील सकल चर्मकार बांधवांकडून ज्ञानेश्वरी विद्या मंदिर शाळेच्या भव्य प्रांगणात शुक्रवार दि.२८ फेब्रुवारी रोजी श्री संत शिरोमणी गुरु रविदास महाराज व श्री कक्कया महाराज यांच्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मुख्य मार्गदर्शक म्हणून गायकवाड हे बोलत होते.पुढे बोलताना गायकवाड म्हणाले की,भारतीय इतिहास आणि साहित्यात संत रविदासांचे महत्वाचे स्थान आहे. त्यांनी शोषित-पीडित-वंचित-दलित जनतेच्या आकांक्षांना आपल्या रचनांमधून अभिव्यक्त केले. सामाजिक न्याय, सामाजिक समता आणि सर्वधर्म समभाव त्यांच्या वाणीचा मूळ स्वर आहे. त्यामुळे आजच्या काळात त्यांचे महान कार्य समजून घेणे खूप महत्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी संत रोहिदास महाराज, ककय्या महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुभाष सूर्यवंशी तर मंचावर
स्वागताध्यक्ष तथा प्रमुख मार्गदर्शक म्हणून रा.च.म. प्रदेशाध्यक्ष माधवराव गायकवाड,उदघाटक संबा वाघमारे (विदर्भाध्यक्ष), मनिषा गायकवाड हिंगोली ,सहादू ठोंबरे,मुरलीधर ठोंबरे, प्रा.विष्णू असोरे,विनोद असोरे, मुरलीधर ठोंबरे,रामकिशन कांबळे, प्रकाश फुलवरे, हर्षवर्धन गायकवाड ,दादाराव पंडित, तुषार गायकवाड, बंटी रणवीर डॉ.चंद्रभान गंगासागरे डॉ. नागनाथ झुंजारे डॉ.भाग्यवंत,रामकिशन कांबळे, नरहरी सोनवणे,चांदोजी कांबळे आदीं मान्यवरांसह समाज बांधव विशेषत; महीला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.मान्यवरांच्या हस्ते गटई कामगारांना किटचे वाटप करण्यात आले.यावेळी उपस्थित बांधवांसाठी महाभोजनाचे आयोजन केले होते. प्रास्ताविक अमोल गायकवाड तर सूत्रसंचालन पवन असोरे आभार सुशिलकुमार दळवी यांनी तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष,सुशिल गायकवाड,
सुशिल कुमार दळवी,बबन अन्नपूर्णे, पुरभाजी असोरे, हरी असोरे, शंकरराव जोगदंड,अनिल नारायणकर, दीपक जोनवाल, लक्ष्मण परसुते, मुंजाजी असोरे, विकास गायकवाड, गजानन सूर्यवंशी, रवि हराळे ज्ञानेश्वर असोरे हरी जोगदंड,रोहिदास जोगदंड, धनराज आसोरे आदींनी परिश्रम घेतले.