मुस्लिम बांधवांनी केला दहशतवादी हल्ल्याचा निषेध;महामहीम राष्ट्रपतींना पाठवले निवेदन.
पूर्णा(प्रतिनिधी)
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे २३ एप्रिल रोजी झालेल्या निर्घृण दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या अमानवी हल्ल्याचा पूर्णा येथील मुस्लिम बांधवांच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत तहसीलदार यांच्यामार्फत महामहीम राष्ट्रपतीं यांच्याकडे दि.२५ एप्रिल रोजी निवेदन पाठवण्यात आले आहे.
पेश ईमाम मौलाना शमीम अहमद रिझवी यांच्या मार्गदर्शनाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,या भ्याड हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटकांचे प्राण गेले. ही क्रूरता माणुसकीला काळिमा फासणारी आहे.आम्ही या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आणि हल्ल्यात बळी पडलेल्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली या हल्ल्याच्या निषेधार्थ पूर्णा शहरातील असंख्य व्यापाऱ्यांनी आपली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले होते. या वेळी मुस्लिम बांधवांकडून पुढील मागणीही करण्यात आली दहशतवादाला धर्म नसतो. अशा कृत्यांविरोधात कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. जेव्हा माणुसकी धोक्यात येते, तेव्हा शांतता राखणाऱ्या नागरिकांनीही ठाम भूमिका घ्यावी लागते. या दहशतवाद्यांना कठोरा तील कठोर शिक्षा भर चौकात फाशी दिली जावी, ही आमची ठाम मागणी आहे. या निवेदन प्रसंगी यांच्यासह शहरातील असंख्य मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी पोलीसांनी चोख बंदोबस्त ठेवण्यात तैनात केला होता.