नदीपात्रात तराफा उलटला;जिवीत हानी टळली
पूर्णा तालुक्यातील कानडखेड -निळा शिवारातील पूर्णा नदीपात्रातील घटना;सहा ते सात जणं बालंबाल बचावले
पूर्णा(प्रतिनिधी)
विवाह सोहळ्यासाठी ताफ्यावरुन माणसांना नदीपल्याड सोडणारी तराफा नाव तुटल्याची घटना २० में रोजी मंगळवारी तालुक्यातील कानडखेड-निळा शिवारातील पूर्णा नदीपात्रात घडल्याचे उघडकीस आले आहे. जाणत्रासावर तालुक्यातील कानखेड पूर्णा नदीपात्रात मंगळवारी दुपारी तराफा उलटून उबडा झाल्याची घटना घडली.तराफ्यावर सवार पाच ते सहा जन सुदैवाने बालंबाल बचावले आहेत.यात महीला व लहान मुलांचासह दोन दुचाकींचाही समावेश असल्याचे समजते.
या बाबत अधिक माहिती असी की, पूर्णा तालूक्यातील निळा येथे ता.२० मे रोजी संभाजी सुर्यवंशी, प्रभाकर सुर्यवंशी यांच्या कन्येचा विवाह सोहळा होता.या विवाह सोहळ्याला जाण्यासाठी मधला मार्ग म्हणून कानडखेड शिवार पूर्णा नदीपात्र ओलांडून जवळ पडणारा आहे.या मार्गे सदर लग्न समारंभाला जाण्यासाठी मंगळवारी दुपारी ११:३० ते १२ वाजे दरम्यान सातेफळ,कात्नेश्वर, आहेरवाडी, नांदेड येथून पाहुणे नागरीक पूर्णा नदीपात्रातून निळा गावाकडे जाण्यासासाठी चालू असलेल्या नाव तराफ्याकडे गेले.सदर नाव तराफ्यात दोन दुचाकी टाकून त्यावरील माणसं बसली नाव चालू होताच काही अंतर नदीपात्रात गेल्यावर एकसाईड वजन अधिक होत नाव उलटली.यात, पुरुष, महिला,लेकरं माणसी व दुचाकी तराफा खाली गेली.त्यामुळे पाण्यात बुडालेल्या माणसांनी गोच्या गंडागळ्या खाल्या.ह्या घटनेमुळे एकच आरडाओरडा झाल्यामुळे तिथे नदीकिनारी असणा-या नागरीक व नावाड्यांनी पाण्यात गेलेली माणसं हाताला धरून काठावर काढली.मोठ्या प्रयत्नाने दुचाकी पाण्यातून बाहेर काढल्या.ही नाव नदीपात्रातील मध्यभाग पाण्यात उलटली असली तर काही तरी विपरीत होण्याची शक्यता होती.परंतु, नदीपात्र मध्यात जाण्या अधिच उलटल्या गेली.यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्यामुळे पाहुणे मंडळींनी सुटकेचा निःश्वास सोडला.या घटनेत काही पुरुष महिला व छोट्या लेकरांचा समावेश असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.दरम्यान, घटनेची माहिती पूर्णा पोलिसांना कळाल्याचे समजते.