समाज भुषण पुरस्कार हा पुर्णेच्या मातीतील माणसांचा सन्मान होय

Spread the love

पूर्णा, ता.२४ (बातमीदार )भगवान बुद्धांमुळे भिक्खुंचा सन्मान होत आहे.शासनाने दिलेला समाज भुषण पुरस्कार हा पुर्णेच्या मातीतील माणसांचा सन्मान होय अशी भावना व्यक्त केली. हा पुरस्कार माझा नसुन सर्व पूर्णेकरांचा असल्याचे प्रतिपादन भदंत उपगुप्त महाथेरो यांनी जाहीर नागरी सत्काराला उत्तर देतांना केले.

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुध्द सार्वजनिक जयंती मंडळाच्या वतीने अखिल भारतीय भिक्खू संघाचे कार्याध्यक्ष भदन्त डॉ. उपगुप्त महाथेरो यांच्या जाहीर नागरी सत्कार समारंभाचे मंगळवारी (ता. २४) आयोजन केले होते.नगर परिषद कार्यालयाच्या प्रांगणात नागरी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता . बोधीसत्व डॉ. बी. आर. आंबेडकर स्मारक व बुध्द विहार समिती पूर्णा या संस्थेला महाराष्ट्र शासनाचा “डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार” प्रदान करण्यात आला आहे . या संस्थेचे अध्यक्ष भदंत. डॉ. उपगुप्त महाथेरो आहेत. तसेच त्यांना आंतरराष्ट्रीय विपस्सना केंद्र लेह-लद्दाख येथे ‘ हिमालयन योगा अवॉर्ड फॉर वर्ल्ड पिस ‘ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचे स्वाताध्यक्ष माजी नगराध्यक्ष डॉ. मोहनराव मोरे होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री गुरुबुध्दी स्वामी मठ संस्थानचे मठाधिपती डॉ. नंदकिशोर शिवाचार्य महाराज, जामा मस्जिदचे पेश इमान मौलाना शमिम अहमद रिजवी, धनगर टाकळी येथील श्री सद्गुरू व्यंकटेश दाजीमहाराज संस्थानचे वेदमूर्ती उमेश महाराज टाकळीकर, फादर मायकल फ्रान्सिस, वारकरी मंडळाचे जिल्हाध्यक्ष सोपानमहाराज बोबडे, भिक्खू पय्यावंश, भदंत महावीरो थेरो, भदंत बोधीधम्मो उपस्थित होते. यावेळी व्यासपीठावर डॉ. कमलाकर कांबळे, डॉ. निता गायकवाड, प्राचार्य डॉ. गणेश जोशी, प्रकाश कांबळे, मंडळाचे अध्यक्ष उत्तम खंदारे, सचिव ॲड . हर्षवर्धन गायकवाड, कार्याध्यक्ष चक्रवर्ती वाघमारे, डॉ. विनय वाघमारे, जाकीर कुरेशी, संतोष एकलारे, हाजी कुरेशी, अमृतराज कदम यांची उपस्थिती होती. प्रमुख उपस्थितात विजयकुमार कदम, अनील खर्गखराटे, देवराव खंदारे, मनोज उबाळे,अशोक धबाले, मधुकर गायकवाड, ॲड. धम्मा जोंधळे, शाम कदम, गजानन हिवरे,अय्युब कुरेशी, दादाराव पंडित, प्रवीण कनकुटे, साहेबराव सोनवणे, अमृत कराळे,मोहन लोखंडे आदींचा समावेश होता.प्रास्ताविक प्रकाश कांबळे यांनी केले. सूत्रसंचालन जगदीश जोगदंड यांनी केले. यावेळी समाजातील विविध जाती धर्मातील नागरिक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page