ग्रंथासोबत नातं जोडल्यास जीवन विकसित होते-कुलगुरू डॉ.अशोक महाजन

Spread the love

पूर्णा ता.२५ (प्रतिनिधी)

ग्रंथासी नातं जोडून कठोर परिश्रम केले तरच जीवन विकसित होते, परिश्रमाने प्रत्येकालाच आपल्यामधील असलेल्या कौशल्याची सिद्धता करता येते असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्र – कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी केलं

पूर्णेतील स्वा.सै.सूर्यभानजी पवार महाविद्यालयांत ग्रंथपालन वर्ग – २०२५ चा निरोप समारंभ आयोजित केला होता यावेळी कुलगुरू महाजन बोलत होते.प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक सचिव, प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार, प्रमुख उपस्थितीत स्वा.रा.तीर्थ विद्यापीठाचे डॉ.जगदीश कुलकर्णी, वसंतराव नाईक कृषि विद्यापीठाचे, डॉ. उदय खोडके,उपकुलसचिव दिवाकर काकडे, मा. नगराध्यक्ष उत्तमराव कदम, ए. एम.गलांडे, शंकर पवार आदीं मान्यवरांची उपस्थिती होती.पुढे बोलताना कुलगुरू महाजन म्हणाले की, स्पर्धेच्या युगात निराश न होता आपल्यासमोर जो संघर्ष आहे त्यामध्ये आनंदाने उत्तर शोधले आणि समाधान देणारे जीवन घडविले तरच जीवन यशस्वी होते.आपल्या जीवनात खरा आनंद आणि समाधान नसेल तर ते यशस्वी जीवन होऊ शकत नाही म्हणून जीवनात आनंद आणि समाधान शोधा हेच खरे यशस्वी जीवन असते असेही त्यांनी याप्रसंगी आपल्या मार्गदर्शनात सांगितले.

अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धेच्या युगात परिश्रमाशिवाय पर्याय नसून जे ग्रंथाशी एकरूप होऊन परिश्रम करतात तेच विद्यार्थी यशस्वी होतात म्हणून ग्रंथ हे मित्र बनवून जीवनाला सुंदर घडविले पाहिजे असे त्यांनी सांगितले.यावेळी डॉ.जगदीश कुलकर्णी, डॉ.उदय खोडके यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.संजय कसाब, आभार प्रा.डॉ.त्रिमूर्ती सोमवंशी यांनी मांनले.प्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

You cannot copy content of this page